- Advertisement -
“काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधाकांची मजबूत फळी उभी राहू शकते. आम्ही देखील हेच बोललो होतो. दोन दिवसांपूर्वी सामनामध्येही आम्ही हेच बोललो होतो. या देशात विरोधकांची जी मजबूत फळी उभी करण्याचं काम सुरू आहे. काँग्रेस शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाचे नेते दिनेश गुंडोराव यांनी देखील शिवसेनेच्या भूमिकेचा संदर्भ दिला आहे. या देशातील विरोधी पक्ष एकत्र आला तरच राजकीय पर्याय उभा राहू शकतो”, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
- Advertisement -