- Advertisement -
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी कोठडी संपल्यानंतर कोर्टाच्या बाकड्यावर बसून आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. ८ ऑगस्ट २०२२ रोजी संजय राऊत यांनी हे पत्र लिहिले आहे. आई मी नक्की परत येईन, असे राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. मी नक्कीच परत येईन. जशी तू माझी आई आहेस, तशीच शिवसेनादेखील आपली आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्या धमक्यांना मी घाबरलो नाही म्हणून मला तुरुंगात जावं लागलं, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
- Advertisement -