- Advertisement -
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावरून राज्यभरात गदारोळ झाला. आज छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक दिन आहे. यानिमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, मध्यंतरी स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरवरून रंगलेला वाद दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या शुभेच्छांमधून दिसून येतोय.
- Advertisement -