- Advertisement -
राज्यात वाहतूक सप्ताह सुरू असताना नवी मुंबई वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून रस्त्यावर विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या चालकांना हेल्मेटचे वाटप सुरू आहे. विना हेल्मेट गाडी चालवताना अपघात झाल्यास चालकाचा मृत्यू होतो. त्याच अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी यात पुढाकार घेत, रस्त्यावर उतरून विना हेल्मेट गाडी चालकांना हेल्मेटचे वाटप केले आहे. मकरसंक्रांतीला आपण एकमेकांना तीळगूळ देत असतो, पण आजही वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वाटप करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांची हीच मकरसंक्रांत असल्याचे म्हणायला हरकत नाही.
- Advertisement -