घरमहाराष्ट्रमनसेकडून महपौरांचा निषेध

मनसेकडून महपौरांचा निषेध

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी देऊ केलेली मदत महापौरांनी नकारली. मात्र त्यांच्यात पक्षातील आमदाराने संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलसाठी उपवन तलावात तयार करण्यात येणाऱ्या तरंगत्या रंगमंचासाठी १० कोटीची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी २० कोटी देण्याची घोषणा केली होती. हा मदतनिधी घेण्यासाठी ठाणे महपौर मिनाक्षी शिंदे यांनी विरोध केला. मात्र आता त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलसाठी उपवन तलावात तयार करण्यात येणाऱ्या तरंगत्या रंगमंचासाठी १० कोटीची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापौरांनी मौन बाळगले असून ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयुक्तांनी दिलेल्या निधीला विरोध करणाऱ्या महापौरांचा मनसेने निषेध केला आहे.

आयुक्तांनी केली होती घोषणा

ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा व ठाणेकर विद्यार्थ्यांना विद्यापिठ उपकेंद्रात नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावा, चांगल्या सुविधा उपकेंद्रात मिळाव्यात या उदात्त हेतूने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उपकेंद्रासाठी २० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या निधीला ठाणे महापौरांनी विरोध केला होता. आता संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टने आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी १० कोटींची लेखी मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमावर १० कोटीची उधळपट्टी केलेली महापौरांना चालते मात्र विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न असलेल्या विद्यापीठाला निधी देण्यास महापौरांचा आक्षेप आहे. या अगोदरही ठाण्यात बॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना याची काळजी घेण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, असा सवाल मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे

- Advertisement -

आधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा

उपवन तलावातील माशांच्या अस्तित्वाला या रंगमंचामुळे काही धोका नाही याची खात्री केली आहे का ? आयुक्त व महापौर यांच्यातील संघर्षामुळे ठाणेकरांची करमणूक होतेच आहे. तरी मुंबई विद्यापीठ उपकेंद्रासाठी दिलेला निधी ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. आधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा त्यानंतर करमणुकीसाठी नवनवीन प्रयोग करा, असा सल्लाही मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -