- Advertisement -
भाजप २२० आमदार निवडून येतील अशा गप्पा मारत होते, पण आज त्यांच्याकडे १४५ आमदार देखील नाहीत. त्यामुळे भाजपने गप्पा मारताना वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहीजे. तसेच गडकरींनी सांगितले की, क्रिकेट आणि राजकारण काहीही होऊ शकते. पण क्रिकेटच्या खेळात बॉल दिसत असतो. पण राजकारणात बॉल दिसत नाही, हा मुलभूत फरक आहे, अशी कोपरखळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावली आहे.
- Advertisement -