‘या’ मागण्या म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केल्या
महापालिकेकडून दरवर्षी रस्त्यावरील खड्डे व चरी भरण्यासाठी स्थायी समितीत १७ कोटी तर चरी भरण्यासाठी १५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर होतात. मात्र प्रत्यक्षात खड्डे भरले असतील तर आजची रस्त्यांची परिस्थती काय आहे? असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे ठेकेदारांनी केलेल्या कामांची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय बिल अदा करण्यात येऊ नये. ज्या ठेकेदारांना खड्डे भरण्याचे काम दिले होते त्याच ठेकेदारांनी चरी भरण्याचे काम केले आहे का? आपले पैसे खड्डयामध्ये गेले आहेत की, पैशामध्ये खड्डे गेलेले आहेत तेच कळत नाही. त्यामुळे त्या ठेकेदारांना बिल अदा करू नये आणि जर बिल अदा केले असेल तर त्यांनी केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. हे चक्र वर्षोनुवर्षे सुरू असून तेच ठेकेदार आणि तेच अधिकारी आहेत का? याचीही सखाेल चौकशी करावी अशीही मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
हेही वाचा – मेट्रोत बाधित वृक्षाच्या पुनर्रोपणासाठी MMRDAच्या हालचाली