घरदेश-विदेशBalasaheb Thackeray : दिल्लीतील नव्या मोगलशाहीविरुद्ध महाराष्ट्र लढतोय, ठाकरे गटाची टीका

Balasaheb Thackeray : दिल्लीतील नव्या मोगलशाहीविरुद्ध महाराष्ट्र लढतोय, ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदूंची सुंता झाली असती. काशी-मथुरेच्या मशिदी झाल्या असत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मराठी माणूस कायमचा गुलाम झाला असता. मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पडला असता. महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीमोल झाला असता. महाराष्ट्र आजही दिल्लीतील नव्या मोगलशाहीविरुद्ध लढत आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळेच, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray: भाजपचा ‘निर्लज्ज’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले – 30 वर्षे सोबत राहून…

- Advertisement -

अल्बर्ट आइनस्टाईन महात्मा गांधींविषयी जे म्हणाले होते, तेच वेगळ्या शब्दांत बाळासाहेब ठाकरेंविषयी म्हणावे लागेल. आइनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते, ‘येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता.’ गांधींच्या अनेक विचारांशी आणि भूमिकांशी शिवसेनाप्रमुख सहमत नव्हते. ते लोकशाहीपेक्षा शिवरायांच्या शिवशाहीवर विश्वास ठेवणारे होते. जेथच्या तेथे न्याय हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र होते. अनेकदा त्यांनी विधायक हुकूमशाहीचे समर्थन केले ते जनतेला न्याय मिळावा म्हणून. ‘करतो, पाहतो, बघू, उद्या या’ या प्रशासकीय शब्दांवर लालफीतशाहीचा दोरखंड आवळलेला होता. तो तोडून जनतेला न्याय देण्यासाठी त्यांना शिवशाहीचे प्रशासन हवे होते, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

बाळासाहेब विरोधकांच्या टीकेचे सदैव धनी होते. तीच त्यांची श्रीमंती होती. लाखो लोकांचा जनसागर त्यांचा जयजयकार करीत असे. हेच त्यांचे भांडवल होते. त्यांनी कारखाने, उद्योग, निर्माण केले नाहीत; पण मुंबई, महाराष्ट्रातील उद्योगांना संरक्षण देऊन लाखो, कोट्यवधी मराठी तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून दिला. मराठी माणसाची चूल त्यांनी सतत पेटत ठेवली. म्हणूनच गांधींप्रमाणेच हाडामांसाचा असा मनुष्य बाळ केशव ठाकरे नावाने या महाराष्ट्रात वावरत होता, यावर येणाऱ्या पिढ्यांना विश्वास ठेवावा लागेल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Balasaheb Thackeray : व्हिडीओ शेअर करत विजय वडेट्टीवार म्हणाले, बाळासाहेब मला…

शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी केली. पण महाराष्ट्राची लूट विनासायास करता यावी यासाठी बाळासाहेबांची शिवसेना ‘गुजरात लॉबी’ने फोडली, पण शिवसेना संपली काय? ती महाराष्ट्राच्या कणाकणांत आहे, मनामनात आहे. श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील, असा विश्वासही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Balasaheb Thackeray : सत्तेच्या मस्तीत माजलेल्या कमळाबाईला…, ठाकरे गटाची जहरी टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -