निवडणूकीच्या निकालानंतर भाजप ही भारतीय जोकर पक्ष बनणार असल्याचे वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे युवा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. या निवडणूकीत भाजपचे उमेदावर निवडणूक हरतील असेही अभिषेक बॅनर्जी म्हणाले. या लोसभेमध्ये सर्व भारतीयांनी एकत्र आले पाहिजे. यंदाची निवडणूक सांस्कृती आणि सभ्यतेचा नाश करणाऱ्या भाजपला हरवण्यासाठी लढवले जाईल असेही ते म्हणाले. येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस २४ मतदार संघातून निवडणूक लढवले असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक यांनी सांगितले. येणारी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्मयंत्री ममता बॅनर्जी यांच्यात असणार असल्याचेही बॅनर्जी म्हणाले.
काय म्हणाले बॅनर्जी
“भाजप हा खोटी आश्वासने देणारा पक्ष आहे. प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये येणार होते त्याबद्दल काय झाले? दोन कोटी नोकरी देणार त्याचे काय झाले? देशातील नागरिक भाजपला कंटळले आहेत.” – अभिषेक बॅनर्जी
सोने तस्करीचा लागला होता आरोप
मागील काही दिवसांमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचे नाव खूप चर्चेत होते. अभिषेक बॅनर्जीवर सोने तस्करीचा आरोप करण्यात आला होता. कोलकाता येथील विमानतळावर अभिषेक व त्यांच्या पत्नीला दोन किलो सोन्यासोबत अटक करण्यात आली होती. मात्र कोलकाता पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना सोडवले अशी माहिती भाजपच्या मंत्र्यांकडून दिली गेली. “तर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडून देईल.” असे वक्तव्य अभिषेक यांनी केले होते.