देशात निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरुवात होत आहे. अशामध्ये राजकीय पंक्षांनी आपले उमेदवार उभे करण्यास सुरूवात केली आहे. आम आदमी पार्टी (आप) चे अध्यक्ष आणि दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब येथील आपल्या उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. यावेळी आप पंजाबमधून १३ जागांवरून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंजाब येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. यावेळी विरोधकांवरही त्यांनी टीका केली.
बरनाला में आयोजित विशाल रैली में पंजाब की जनता से संवाद करने मंच पर पहुंचे राष्ट्रीय संयोजक व दिल्ली के मुख्यमंत्री @ArvindKejriwal, पंजाब प्रभारी @msisodia भी पहुंचे साथ मे। @AAPPunjab संयोजक @BhagwantMann भी मंच पर मौजूद !#AKinBarnala pic.twitter.com/v7NT5amxa1
— AAP (@AamAadmiParty) January 20, 2019
काय म्हणालेत केजरीवाल
कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की,”लोकांना बदल हवा आहे. ते मोदी सरकारला कंटाळले आहे. अमित शहा आणि मोदी यांनी देशाचे नुकसान केले आहे. लोकांच्या मनात ते विष कालवत आहेत. जर ते पून्हा सत्तेत आलेत तर हा देश विभक्त होईल.” ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे त्यांनी घोषीत केली आहेत. संगरूर, फरीदकोट,होशियारपूर,अमृतसर आणि आनंदपूर या मतदार संघातील उमेदवारांची नावे त्यांनी घोषीत केली.