घरदेश-विदेशचीनच्या खोड्या सुरूच, अरुणाचल प्रदेश सीमेजवळ वसवली तीन गावे

चीनच्या खोड्या सुरूच, अरुणाचल प्रदेश सीमेजवळ वसवली तीन गावे

Subscribe

पूर्व लडाखमध्ये तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेजवळ हालचाली

पूर्व लडाखमध्ये तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) आपल्या कारवाया सुरूच आहेत. चीनने पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये भारत, चीन आणि भूतानच्या सीमेजवळ तीन गावं वसवली आहेत.

ची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत. ज्या ठिकाणी चीनने ही तीन गावे वसवली आहेत, तो भाग बमलापासून सुमारे ५ किमी दूर आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही माहिती उपग्रहांनी नुकत्याच घेतलेल्या छायाचित्रांवरुन प्राप्त झाली आहे. चीनचं हे पाऊल दोन्ही देशांदरम्यान या क्षेत्रातील सीमावादाला अधिक गुंतागुंतीचं बनवू शकतो. चीनने या भागात केलेलं नवं बांधकाम हे अरुणाचल प्रदेशलगतच्या भागावर आपला दावा मजबूत करण्याच्या चीनच्या अजेंड्याचा भाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -