कोरोनाचे संकट देशात असतानाचा अशा परिस्थितीत सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, येत्या काळात व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते, असे संकेत रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावे लागणार असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे.
We've not exhausted our policy options whether it relates to rate cut or any other aspect of central banking…We are constantly watchful & as & when we anticipate certain emerging situation, we'll deal with it: RBI Governor Shaktikanta Das (file pic) today at a newspaper event pic.twitter.com/WEjpYPfVHQ
— ANI (@ANI) August 27, 2020
काय म्हणाले शक्तिकांत दास
रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपययोजना लवकरच हटवल्या जातील असे कोणीही समजू नये. बँकिंग क्षेत्र सध्या उत्तम स्थितीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनिकरण एक योग्य दिशेत उचलण्यात आलेले पाऊल आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करत मार्गावर आणण्यासाठी दक्षताही बाळगणे तितकच महत्त्वाचे आहे. बँकांना सद्यस्थितीत आव्हानांचा सामना करावा लागेल हे स्पष्ट आहे. परंतु बँका या आव्हांनांना कसा प्रतिसाद आणि तोंड देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. देशातील करोना महामारीचा प्रकोप आणि त्याच्या अन्य बाबींवर स्पष्टता आल्यानंतर रिझर्व्ह बँक महागाई आणि आर्थिक वद्धीबाबत आपला अंदाज वर्तवणार आहे. कर्ज देण्यात गरजेपेक्षा अधिक सतर्कता बाळगण्याने बँकांनाच अधिक नुकसान होणार आहे आणि मूलभूत कामं न केल्याने बँकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. जोखीम पत्करण्यापासून बचाव करण्याऐवजी बँकांनी आपल्या रिक्स मॅनेजमेंट आणि गव्हर्नंन्स फ्रेमवर्कला अधिक सक्षम केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.