घरदेश-विदेशLok Sabha 2024 : शहाणपणाच्या भूमिकांबद्दल मोदींची कधीच ख्याती नव्हती, ठाकरे गटाची...

Lok Sabha 2024 : शहाणपणाच्या भूमिकांबद्दल मोदींची कधीच ख्याती नव्हती, ठाकरे गटाची बोचरी टीका

Subscribe

निवडणूक रोख्यांचा प्रकार हा सरळ वसुली आणि खंडणीखोरीचा प्रकार आहे. भाजपाच्या खात्यात वसुली माध्यमातून दहा-पंधरा हजार कोटी रुपये जमा केले जातात आणि मोदी महाराष्ट्रात येऊन रामाचे कीर्तन करतात. हे मूर्ख बनविण्याचेच धंदे आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मुंबई : विरोधक जनतेला मूर्ख बनवत आहेत, असे गमतीचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येऊन केले. शहाणपणाच्या भूमिकांबद्दल मोदी यांची कधीच ख्याती नव्हती. त्यात आता निवडणुकांचा मोसम असल्याने मोदी यांच्या वक्तव्यांचा शिमगाच सुरू झाला आहे. मोदी सरकारने दहा वर्षे देशाला व जनतेला मूर्खच बनवले याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, पण विरोधक जनतेला मूर्ख बनवत असल्याचा फटाका मोदी यांनी फोडला, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे. (Lok Sabha Elections 2024 Thackeray group targets Modi over his statement in Nagpur)

मोदी प्रचारासाठी तामीळनाडूतील वेल्लोर आणि मेट्टूपालयम येथे गेले. तेथे त्यांनी काय सांगावे? ते म्हणाले, ‘‘मोदी सरकार देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे, तर द्रमुक आणि काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत.’’ मोदी (PM Narendra Modi) यांचे हे विधान ऐकल्यावर जनतेला नक्की मूर्ख कोण बनवत आहे, त्याचा खुलासा होईल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv Sena UBT) सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री अडचणीत; इतिहासाची मोडतोड प्रकरणी कायदेशीर नोटीस

महाराष्ट्रातील प्रत्येक भ्रष्टाचारी भाजपात (Every corrupt person in Maharashtra is in BJP)

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील सर्व भ्रष्टाचारी, व्यभिचारी भाजपात घेतले. त्यातल्या अनेक बड्या भ्रष्टाचाऱ्यांवर स्वतः मोदी यांनी प्रहार केले होते. भाजपात या सगळ्यांना प्रवेश देऊन मोदी यांनी त्या सगळ्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवले आहे. अजित पवार वगैरे लोकांना तर तुरुंगात चक्की पिसायला पाठवायचा निर्णय विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ते पवार आज फडणवीस यांच्या टेबलावर बसून सत्तेचे पत्ते पिसत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक भ्रष्टाचारी भाजपात आहे आणि मोदी त्या सगळ्यांना अभय देत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना कोण वाचवत आहे, हेदेखील उघड आहे, असा प्रहार ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

निवडणूक रोख्यांचा प्रकार हा सरळ वसुली आणि खंडणीखोरीचा प्रकार आहे. भाजपाच्या खात्यात वसुली माध्यमातून दहा-पंधरा हजार कोटी रुपये जमा केले जातात आणि मोदी महाराष्ट्रात येऊन रामाचे कीर्तन करतात. हे मूर्ख बनविण्याचेच धंदे आहेत. मोदी यांनी पंतप्रधानपदाचे अवमूल्यन केले. लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले. श्रीमंतांना श्रीमंत करून गरीबांना फक्त स्वप्नेच दाखवली. हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे, अशी जहरी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha : नारायण राणेंना कमी लीड मिळालं तर…; नितेश राणेंकडून मतदारांना धमकीवजा इशारा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -