Mohan Bhagwat : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (77th Independence Day) ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, देशाने तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जाताना जगाचे नेतृत्व करावे, असे मोहन भागवत म्हणाले. (Mohan Bhagwat The country should lead the world as it moves forward A big speech by the team leader)
हेही वाचा – PM Modi Speech : “75 वर्षांत काही विकृती…” पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर साधला निशाणा
समर्थ भारत संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, भारताला आपली क्षमता वाढवण्याची गरज आहे. देश आपल्या सांस्कृतिक ताकद आणि क्षमतांच्या जोरावर जगासाठी आशेचा किरण बनू शकतो. देशाने तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जावे आणि जगाचे नेतृत्व करावे, असे विधान करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मोहन भागवत म्हणाले की, देशविरोधी शक्तींना आपण पुढे जावे असे वाटत नाही. भारत जगाला जागृत करण्यास सक्षम आहे, परंतु काही शक्ती भारताची प्रगती रोखू इच्छितात. त्यांच्यापासून सावध राहून आपल्या राष्ट्रध्वजात दडलेल्या संदेशानुसार काम करून देश एकसंध ठेवला पाहिजे. जेणेकरून नकारात्मक शक्ती यशस्वी होऊ शकत नाहीत.
National Flag hosted by Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat at Bengaluru. Sarkaryavaah Dattatreya Hosabale was also present on this occasion. pic.twitter.com/d5sQultLKm
— RSS (@RSSorg) August 15, 2023
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचे महत्त्व
राष्ट्रध्वजाबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ध्वजाच्या शीर्षस्थानी असलेला भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे, जो जीवनाला तमसो मा ज्योतिर्गमय (अंधारातून प्रकाशाकडे) नेतो. पांढरा रंग कोणत्याही स्वार्थाशिवाय शुद्धतेने काम करण्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग श्री लक्ष्मी (संपत्ती) चे प्रतीक आहे. जे बुद्धिमत्ता, विश्वास आणि निःस्वार्थ शक्ती प्राप्त करण्यास मदत करते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी ने स्वतंत्रता दिवस के अवसर पर बंगलुरु में राष्ट्रीय ध्वज फहराया और सम्बोधित किया। इस अवसर पर मान. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले जी भी उपस्थित थे। pic.twitter.com/dItvp5IIPA
— RSS (@RSSorg) August 15, 2023
जगाला जागे करण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळाले
स्वातंत्र्याबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, भारत जगाला शहाणपण, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवू शकतो. आपण सूर्याची पूजा करतो, म्हणूनच आपल्याला भारत म्हटले जाते, ज्यामध्ये बहा म्हणजे प्रकाश. जगाला जागे करण्यासाठीच भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे ते म्हणाले.
हेही वाचा – PM Modi Speech : मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण; मात्र ‘कुटुंब’ शब्दावरून काँग्रेसने घेतला आक्षेप