घरदेश-विदेशपीएम मोदी युक्रेनवर म्हणाले, जगभरात अशांतता असताना आज भारतासाठी मजबूत होणे महत्त्वाचे

पीएम मोदी युक्रेनवर म्हणाले, जगभरात अशांतता असताना आज भारतासाठी मजबूत होणे महत्त्वाचे

Subscribe

रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यापासून इथपर्यंतचा प्रवास आम्ही सर्व संघर्षातून लोखंड घेत आलो आहोत. विकसित आणि समृद्ध भारत हे प्रत्येक भारतीयांचे ध्येय आहे. या समृद्ध भारतासाठी उत्तर प्रदेश विकसित आणि समृद्ध होणे तितकेच महत्त्वाचे आहे, असंही मोदींनी सांगितलंय. 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर मोठं विधान केलंय. सध्या जगात किती उलथापालथी सुरू आहेत ते तुम्ही पाहत आहात, असे त्यांनी बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. उत्तर प्रदेशातील बहराईच येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना नरेंद्र मोदी बोलत होते. अशा परिस्थितीत आज भारतासाठी आणि संपूर्ण मानवजातीने खंबीर असणे अत्यंत आवश्यक आहे. आज तुमचे प्रत्येक मत भारत मजबूत करेल. शाळेत लूज फिटिंग मास्टर असल्यास मुलांना काय आवडते? त्यामुळेच शिक्षक खंबीर असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते, असंही पीएम नरेंद्र मोदी म्हणाले.

तुमच्या क्षेत्रात एखादा इन्स्पेक्टर कमकुवत असेल तर तो तुमच्यासाठी योग्य असेल का? तर त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या देशाची आणि राज्याची जबाबदारीही भक्कम खांद्यावर असायला हवी, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले. सुहेलदेवांच्या भूमीतील जनतेचे प्रत्येक मत देशाला बळकट करेल, असे ते म्हणाले. रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यापासून इथपर्यंतचा प्रवास आम्ही सर्व संघर्षातून लोखंड घेत आलो आहोत. विकसित आणि समृद्ध भारत हे प्रत्येक भारतीयांचे ध्येय आहे. या समृद्ध भारतासाठी उत्तर प्रदेश विकसित आणि समृद्ध होणे तितकेच महत्त्वाचे आहे, असंही मोदींनी सांगितलंय.

- Advertisement -

मोकाट जनावरांवर पंतप्रधान मोदी म्हणतात…

मोकाट जनावरांमुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आम्ही गांभीर्याने घेत आहोत. आम्हाला मार्ग सापडले आहेत आणि मला तुमची चिंता पूर्णपणे समजली आहे आणि मी तुम्हाला सांगेन की, मला एक मार्ग सापडला आहे. 10 मार्चला आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आम्ही त्या सर्व नवीन योजना योगीजींच्या नेतृत्वाखाली लागू करू, असंही मोदींनी सांगितलंय.

कुटुंबीयांच्या सरकारने वाट लावली

राज्यात आधीच्या सरकारवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, 2014 ते 2017 या काळात मी या भयानक कुटुंबीयांचे काम, त्यांचे व्यवसाय, त्यांचे कारनामे अगदी जवळून पाहिलेत. आपल्या स्वार्थासाठी कुटुंबानं बनवलेली सरकारे लोकांच्या हिताचा त्याग करतात, तेव्हा वाईट वाटते. बस्ती, गोंडा, बहराईच आणि बलरामपूरच्या लोकांना 2017 पूर्वी खूप भेदभावाचा सामना करावा लागला होता. पण आता योगीजी (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) यांचे सरकार गेल्या 5 वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात सुखसोयी येऊ शकेल आणि गरिबांना सन्मान मिळेल.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे आता उत्तर प्रदेशातील भीतीचे वातावरण दूर होत आहे. तुमच्यासाठी पुढे जाण्याचे मार्ग खुले होत आहेत, नवीन मार्ग तयार केले जात आहेत. मुलाला चांगले शिक्षण द्यायचे आहे, म्हणून भाजप सरकार शाळांची स्थिती सुधारत आहे. आज उत्तर प्रदेश ज्या विकासाच्या वाटेवर चालला आहे, त्यामध्ये डबल इंजिनचे सरकारही तितकेच महत्त्वाचे आहे. बहराईचमध्ये पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही सर्वजण जे भाजपला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने येथे आला आहात, यावेळीही यूपी निवडणुकीत विजय होणार आहे. एकदा 2014, दुसऱ्यांदा 2017, तिसऱ्यांदा 2019 आणि यावेळी 2022 मध्ये विजयाचे चौकार मारणार असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले.


हेही वाचाः मुंबईकरांनो, कृपाकरून घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचे आवाहन

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -