घरसंपादकीयदिन विशेषवारकरी संत, कवी संत नामदेव

वारकरी संत, कवी संत नामदेव

Subscribe

 

 

- Advertisement -

 

संत नामदेव यांचा आज स्मृतिदिन. संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत, कवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी हंगोलीतील नरसी-बामणी येथे दामाशेट्टी व गोणाई यांच्या पोटी झाला. दामाशेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. संत नामदेव यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली. पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले.
पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवांची मंदिरे उभारलेली आहेत. ‘संत शिरोमणी’ असे त्यांना म्हटले जाते. भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये शनिवारी ३ जुलै, १३५० रोजी पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -