घरमनोरंजननसीरुद्दीन यांनी व्यक्त केली समाजातील मुलांबाबत चिंता

नसीरुद्दीन यांनी व्यक्त केली समाजातील मुलांबाबत चिंता

Subscribe

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीसस अधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घटली होती. त्यावर आता अभिनेता नसीरुद्दीन शहा प्रतिक्रीया दिली आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीसस अधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घटली होती. त्यावर आता अभिनेता नसीरुद्दीन शहा प्रतिक्रीया दिली आहे. समाजात विष पसरल्यानं आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून त्यांनी भारतातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता गाईचा जीवन माणसांपेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असं ते म्हणाले.

बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव 

या महिन्यातील ३ डिसेंबरला बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला. यामध्ये पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना नसीरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केलं. ‘देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,’ असं शहांनी म्हटलं. ते एका संकेतस्थळाशी बोलत होते.

- Advertisement -

परिस्थितीची भीती वाटते

‘सध्या देशात गाईचा जीव माणसापेक्षा जास्त मौल्यवान झाला आहे. गाईचे प्राण पोलीस अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरलं आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल’, अशा शब्दांमध्ये त्यांनी देशातील परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली.

वाचा : विराट हा जगातील सर्वात उद्धट खेळाडू – नसिरुद्दीन शाह

- Advertisement -

वाचा – भारतीय चाहत्यांमुळं तुला पगार मिळतो, BCCIनं विराटला सुनावलं

वाचा – चाहत्याला देश सोडून जा सांगितल्यामुळे विराट झाला ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -