बॉलिवूडचे करण -अर्जून म्हणजेच सलमान- शाहरूख आता ऐकमेकांमधील वाद विसरले आहेत. आता हे दोघेही एकमेकांचे कौतूक करताना दिसतात. नुकताच सलमानने शाहरूखचा एक व्हीडीओ शेअर करत शाहरूखचे तोंडभरून कौतूक केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या दिवळी पार्टीत शाहरूखनं ऐश्वर्या रायची मॅनेजर अर्चना सदानंदला आगीतून वाचवलं होतं. शाहरूखच्या या धाडसाचं कौतूक सलमानने केलं आहे. सलमानने सोशलमिडीयावर शाहरूखचं कौतूक केलं आहे. सलमानने शाहरूखचं कौतूक करताना ‘हॅपी न्यू इअर’ चित्रपटातील एक सीन पोस्ट केला आहे. यात शूटिंग दरम्यान शाहरुखच्या शर्टाला आग लागते आणि शाहरुख न घाबरता तिथून निघून जातो. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला सलमान खानच्या आवाजातील एक डायलॉग ऐकू येतोय. ‘हिरो तो असतो जो आगीत उडी मारून ती आग विझवून दुसऱ्यांचे प्राण वाचवतो,’ असा तो डायलॉग आहे.
काय घडलं नेमंक पार्टीत?
अमिताभ बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टीचं खास आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीदरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर अर्चना सदानंदच्या लेहेंग्याला आग लागली. त्यावेळी लगेचच शाहरुखनं आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर लगेचच शाहरुखनं त्याचं जॅकेट अर्चनाला दिलं. मॅनेजरला वाचवताना शाहरुखही थोडा फार भाजला आहे.
अर्चनाच्या लेहेंग्याला आग लागल्यानंतर शाहरुखच्या आधी ऐश्वर्या मदतीसाठी धावली होती, ऐश्वर्यासुद्धा तिला वाचवताना जखमी झाली आहे. तर, अर्चना या आगीत १५ टक्के भाजली असून तिला तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे.