घरताज्या घडामोडीभाजपचं अनोखं आंदोलन; शरद पवारांना 'जय श्री राम' लिहून १० लाख पत्रे...

भाजपचं अनोखं आंदोलन; शरद पवारांना ‘जय श्री राम’ लिहून १० लाख पत्रे पाठवणार

Subscribe

सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा हवाला देऊन आता भाजपने शरद पवार आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भाजप युवा मोर्चाच्यावतीने शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जय श्री राम लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज राज्यभरातून या उपक्रमाला सुरुवात झाली असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.

विक्रांत पाटील यांनी स्वतः पनवेल येथील पोस्ट ऑफिसमध्ये शरद पवारांना पत्र पाठवले. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या विषयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वादग्रस्त विधान करत समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असे विधान एका जाणत्या नेत्याने करणे म्हणजे फारच खेदजनक आहे.”

- Advertisement -

काय म्हणाले होते शरद पवार

सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “कोणत्या गोष्टीला कधी महत्त्व द्यायचे, हे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. आमच्यादृष्टीने आज कोरोना घालवणे हे महत्त्वाचे आहे. काही लोकांना मंदीर बांधून कोरोनाचा प्रश्न सुटेल असे वाटत असेल, तर आम्हाला त्याबाबत कल्पना नाही.”

शरद पवार काय म्हणाले पाहा? पवारांच्या वक्तव्याचा तथाकथित मीडिया कडून विपर्यास? पत्रकराने शरद पवार साहेबांना प्रश्न विचारला “देशात करोनाची महामारी असताना भाजपने राममंदिराच्या भुमिपुजनाचा घाट घातला आहे, तुमच मत काय?” त्यावर शरद पवार म्हणाले “ प्रतिक्रिया नाही,प्रश्न असा आहे की, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, प्राधान्य द्यायचं याचा निर्णय प्रत्येकजण घेत असतो.आम्हाला अस वाटत की, कोरोना मध्ये सापडलेले लोक आहेत त्यांना कसं बाहेर काढायचं. त्या कामाला आपण प्राधान्य देऊ.काही लोकांना अस वाटत असेल की, मंदीर बांधून कदाचित करोना जाईल आणि त्या भावनेने त्यांनी कदाचित हा कार्यक्रम घेतला असावा असं मला वाटतं माहीत नाही. पण आमच्या दृष्टीने आम्हाला कोरोना हे संकट महत्त्वाचं आहे.

Posted by दणक्यात on Monday, July 20, 2020

- Advertisement -

भाजपने हा विषय आता राष्ट्रीय मुद्द केला असून राममंदिराच्या भूमिपूजनासोबतच विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपचे असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मोठ्या संख्येने पत्र जमा करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -