आज राज्यात २२८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,३०० झाली आहे. तर १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज १२२५ रुग्ण बरे झाले असून एकूण ३१,३३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण ३८,४९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ३९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या १०३ रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २४६५ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर -९, सातारा -६, सोलापूर -४, नवी मुंबई -३, रायगड -३, सांगली ३, पनवेल -२, अकोला -३, ठाणे -१, नाशिक -१ आणि अहमदनगर -१ असे आहेत.