घरमहाराष्ट्रडायलिसिसचे पेशंट अधिक परंतु यंत्रणा कमी

डायलिसिसचे पेशंट अधिक परंतु यंत्रणा कमी

Subscribe

देशात प्रत्येक वर्षी दोन लाख डायलिसिसचे रूग्ण वाढत आहेत,परंतु यंत्रणा कमी पडत आहेत.

भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो पण बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे किडनी फेल्युअरसाठी जबाबदार ठरत आहेत. त्यामुळे तरूण पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे. देशात प्रत्येक वर्षी दोन लाख डायलिसिसचे रूग्ण वाढत आहेत. त्यामानाने डायलिसिस मशीनची कमतरता भासत आहे अशी माहिती नेफरोलॉजिस्ट डॉ दिनेश महाजन यांनी दिली. जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने डॉ महाजन यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किडनीसंदर्भातील आजाराची लक्षणे, उपाय आणि घ्यावयाची दक्षता याविषयी माहिती त्यांनी दिली.

गेल्या दहा वर्षात देशात किडीनीच्या आजारासंदर्भातील रूग्ण वाढले आहेत. शंभर रूग्णांमागे १७ रूग्ण हे किडनीच्या आजाराचे प्रमाण आहे. दरवर्षी २ लाख रूग्णांना डायलिसिस करण्यासंदर्भात डॉक्टरकडून सुचना केली जाते. मात्र त्यातील १० टक्के रूग्ण डायलिसिस करतात. उर्वरित लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. तसेच ग्रामीण भागात डायलिसिसची सुविधाही नाही.

- Advertisement -

डायलेसीस ही खर्चिक बाब

शहरात अनेक रूग्णालयात डायलिसिस सेंटर उभारण्यात येत आहेत, मात्र ते सेंटर कमी पडत आहेत. तसेच डायलिसिस ही खर्चिक बाब ही आहे. ५० टक्के मधुमेह आणि २० टक्के रक्तदाब अशा ७० टक्के प्रमाण हे किडनी फेल्यूअरसाठी जबाबदार असतात. उर्वरित ३० टक्के प्रमाण हे इतर अनेक कारणांमुळे होतात.

तरूणांनी काळजी घ्या

डायलिसिसच्या वाढत्या संख्येनुसार यंत्रणा कमी पडत आहे. हे जरी खरे असले तरी सरकारवर प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहता कामा नये. एकदा डायलेसीस सुरू झाले की शेवटपर्यंत असते. त्यामुळे आपणच आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे असेही महाजन यांनी सांगितले. किडनी स्टोनचे प्रमाणही वाढत आहे, त्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि मीठ कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.असे देखील सांगितले. ३० ते ३५ वयोगटातील तरूणांना या आजाराने पछाडले आहे. त्यामुळे तरूणांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही डॉ महाजन यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -