सर्वांनी मतदान करायला हवं, राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी मतदान करायला हवं. निवडणूक आयोगही म्हणतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय भाऊजी दफ्तर उच्च प्राथमिक शाळेच्या संघ बिल्डिंगमागील मतदान केंद्रात भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भागवत हे सकाळी लवकरच मतदान केंद्रावर पोहोचले होते. तसेच नोटा हा पर्याय नसून जो उमेदवार योग्य वाटत असेल त्याला मत दिलं पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. भैय्याजी जोशी यांनी सरसंघचालक मोहन भागवत मतदान केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे मतदान केंद्रावर दोघेही सर्वात पहिले पोहोचले होते.
सर्वप्रथम मतदान केले
संरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम मतदान केले आहे. त्यासाठी सकाळी-सकाळीच ते मतदान केंद्रावर हजर झाले होते. येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पहिला हक्कही त्यांनीच बजावला. मतदानासाठी पहिला माझा नंबर हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे, मतदान केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रत्येकाने मतदान करायला हवं, मतदान कराच असा संदेशही भागवत यांनी देशातील नागरिकांना दिला आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी सर्वांनी मतदान करायलाच हवं. निवडणूक आयोगही सांगतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.
RSS Chief Mohan Bhagwat after casting his vote for the Nagpur parliamentary constituency in the #LokSabhaElections2019: Voting is our duty, everyone should vote. pic.twitter.com/iC8pkirwc5
— ANI (@ANI) April 11, 2019
योग्य व्यक्तीला मत द्या
मतदान शांततापूर्ण पार पडावं अशी अपेक्षा आहे. शांतपणे सर्व प्रक्रिया पार पडावी यासाठी लोकांनी मदत करावी, असं आवाहन करतो. जे सरकार निवडणूक येईल ते देशहातिसाठी काम करेल, अशी अपेक्षा भैय्याजी जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. नोटासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘प्रत्येक व्यक्तीने आपलं मत नोंदवलं पाहिजे. नोटा हे मत व्यक्त करण्याचा पर्याय नाही. जो योग्य वाटेल त्याला मत दिलं पाहिजे’. देशासाठी प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असून स्थिर सरकार देणं लोकांची प्राथमिकता असली पाहिजे. स्थिर सरकार देशाची गरज आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.