घरमहाराष्ट्रमुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

Subscribe

मुंबई-नाशिक महामार्गावर आटगावजवळ भीषण अपघातात ४ जण जागीच ठार.

एकीकडे राज्यभरात पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाची गडबड सुरू असतानाच नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरून जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनरने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या चार जणांना धडक दिली. शहापूरजवळ आटगाव येथे हा भीषण अपघात घडला. कंटेनरचा वेग आणि दिलेली धडक इतकी भीषण होती, की या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या चौघांना धडक दिल्यानंतर हा कंटेनर थेट महामार्गालगतच्या रेल्वे रळावर घुसला. सुदैवाने यावेळी रुळावरून कोणतीही ट्रेन जात नसल्यामुळे या वेळी मोठी दुर्घटना टळली. मात्र, चार जण जागीच ठार झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी सकाळी साधारण ९ ते ९.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अपघातानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व मृतदेह शहापूरच्या जिल्हा रुग्णालयात आणले असून पंचनाम्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून लवकरच त्यासंदर्भातली माहिती देण्यात येईल, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -