मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईवरुन पुण्याला जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. खंडाळा घाटामध्ये मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरले. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ दुपारी दोन वाजता ही घटना घडली. रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून इंजिन हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. इंजिन रुळावरुन घसरल्यामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक एक ते दीड तास उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.
मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरले; पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
written By My Mahanagar Team
Mumbai
रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून इंजिन हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -