घरमहाराष्ट्रठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी; पडळकरांचा घणाघात

ठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी; पडळकरांचा घणाघात

Subscribe

ड्रग्ज आणि गांजा तस्करी करणार्या माफियांचे मागे सरकार आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केली. ते पंढरपुरात बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. याच प्रश्नावर गुरुवारपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. परंतु राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.‌आता पर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र आत्तापर्यंत एक ही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही असे असताना दुसरीकडे मात्र ठाकरे सरकार मधील मंत्री ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या सुटके बाबत प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. सरकार ड्रग्ज आणि गांजा माफियांच्या मागे असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -