घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राला अशांत करण्यासाठी लबाड कोल्हे आणि लांडगे... आशिष शेलारांची विरोधकांवर टीका

महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी लबाड कोल्हे आणि लांडगे… आशिष शेलारांची विरोधकांवर टीका

Subscribe

मुंबई : राज्यात सध्या कंत्राटी भरतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. हा वादग्रस्त निर्णय रद्द केल्याचे जाहीर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा ठपका महाविकास आघाडी सरकारवर ठेवला होता. त्याच अनुषंगाने मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार Adv. आशिष शेलार यांनी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.

हेही वाचा – मुंबई-महाराष्ट्राची प्रतिष्ठा ‘मिंधे’ सरकारच्या कारभाराने काळवंडली, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

कंत्राटी भरती प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. कंत्राटी नोकरभरती करण्याचे पाप सर्वात पहिल्यांदा काँग्रेसच्या काळात 2010पासून करण्यात आले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना अनेक खात्यांत कंत्राटी नोकरभरती केली. आज जे आमच्यावर कंत्राटी नोकरभरतीचा आरोप करत आहेत, त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच नऊ कंपन्यांना नोकरभरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यांनी केलेले पाप आमच्या माथ्यावर फोडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

पोलीस, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यासारख्या पदांवर कंत्राटी भरतीचा प्रयत्न या सरकारकडून झाला आहे. आमच्या सरकारने कधीच महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरली नव्हती. यामुळे स्वत:चे अपयश लपवण्याकरिता काही तरी संदर्भ काढायचे आणि टीका करायची, असे या सरकारचे सुरू असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. तर, कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा जीआर फडणवीस रद्द करणार का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

हेही वाचा – Israel Hamas War : गडकरी, गोयल, फडणवीसांना घेतले पवारांनी फैलावर अन् मोदींचे केले कौतुक

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचे पाप 100 टक्के काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि उबाठाचे आहे, हे पुराव्यानिशी उघड करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटारड्या विरोधकांना उघडे पाडले. हा जीआर रद्द करुन, ‘देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले!’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली की, महाराष्ट्राला अशांत करण्यासाठी प्रत्येक विषयावर हे लबाड कोल्हे आणि लांडगे अशीच कोल्हेकुई करून जनतेला संभ्रमित करतात. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे ढोंगी चेहरे उघडे पाडले त्यांचे दात घशात घातल्याची टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -