घरमहाराष्ट्रमोदींचा पराभव करण्यासाठी नाना पटोलेंचे नारीशक्तीला आवाहन, म्हणाले...

मोदींचा पराभव करण्यासाठी नाना पटोलेंचे नारीशक्तीला आवाहन, म्हणाले…

Subscribe

मुंबई व महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत त्यावर आवाज उठवला पाहिजे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महिला मतदारांना न्यायासाठी मागणी करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : महागाईचा मुद्दा हे मोठे शस्त्र तुमच्या हातात आहे, त्यावर सरकारविरोधात आंदोलन केले पाहिजे. मुंबई व महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत त्यावर आवाज उठवला पाहिजे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महिला मतदारांना न्यायासाठी मागणी करण्याचे आवाहन केले आहे. तर महिलांनी मतदानाच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव नक्की होईल असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. यावेळी नाना पटोले यांनी राज्यातील विविध मुद्द्यावरून सरकारवर निशाणा देखील साधला. (Nana Patole appeal to Women to defeat PM Narendra Modi)

हेही वाचा – …अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवेल, जयंत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

- Advertisement -

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षात महिलांना सन्मान दिला जातो, इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तर सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती पण त्यांनी ते पद नाकारले, त्या त्यागमूर्ती आहेत. तुम्ही पहिला काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत ही तुमची मोठी ओळख आहे. या पदाचा वापर काँग्रेस पक्ष संघटन वाढवण्यासाठी करा.

तसेच, नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या 50 टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना करावा लागतो. महागाईने जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे, असेही त्यांच्याकडून यावेळी महिलांना सांगण्यात आले.

- Advertisement -

महागाईचा मुद्दा हे मोठे शस्त्र तुमच्या हातात आहे, त्यावर सरकारविरोधात आंदोलन केले पाहिजे. मुंबई व महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत त्यावर आवाज उठवला पाहिजे. तुम्ही कमजोर समजू नका, तुमच्यातला न्यूयगंड काढून टाका. लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा आणि दिल्लीतल्या मोदी सरकारचा पराभव करा, असे आवाहन पटोले यांच्याकडून करण्यात आले आहे.

राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. मुंबईत लोकलमध्ये मुलीवर अत्याचार झाला, चर्चेगेटजवळ महिला वसतिगृहात मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. मुंबईत एका नराधमाने महिलेचे तुकडे करण्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार केला. राज्याच्या इतर भागातही महिला अत्याचारांच्या घटना वाढलेल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकार महिला अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरले आहे. महिला काँग्रेसने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवला असून यापुढेही महिलांच्या प्रश्नांसह जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवेल. आगामी निवडणुकांत महिलाही मोठ्या संख्येने प्रचारात उतरतील व काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावतील, असे महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी सांगितले.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -