घरताज्या घडामोडीनाशकात बेशिस्त साडेचार हजार नागरिकांवर गुन्हा

नाशकात बेशिस्त साडेचार हजार नागरिकांवर गुन्हा

Subscribe

२ हजार ११६ वाहने जप्त; शहर पोलिसांची कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली असताना काहीजण आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे शहर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. पोलिसांनी १९ मार्च ते ३ मे या कालावधीत ४ हजार ४७५ बेशिस्त नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण भटकंती करणार्‍यांची दोन हजार ११६ वाहने जप्त केली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तिसर्‍यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. तरीही अनेक नागरिक फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस कारवाई करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १ हजार ५३९ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. विनाकारण शहरात फिरणार्‍या, विनापरवानगी दुकाने सुरु करणारे, परिसरात घोळक्याने बसणारे, खेळणार्‍यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सोशल मीडियावरुन अफवा, दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या आठजणांवर कारवाई केली आहे.

- Advertisement -

वाहनचालकांना १९ लाख ८९ हजार रुपये दंड

सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा ८५३ नागरिकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. २५ मार्च ते ३ मे या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांना १९ लाख ८९ हजार रुपयांचा दंड केला असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -