घरमहाराष्ट्रनाशिककर्ज, नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Subscribe

निफाड तालुक्यातील दीक्षी येथील घटना, मळ्यातील निवारा शेडमध्ये घेतला गळफास

निफाड तालुक्यातील दीक्षी येथील रामदास भास्कर शिंदे (वय ४५) या शेतकर्‍याने कर्ज व सतत च्या नापिकीला कंटाळून आपल्या मळ्यातील निवारा शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

त्यांच्या एकत्र कुटुंबाची सुमारे सहा एकर शेती होती, तर त्यांच्या कुटुंबावर दीक्षी विविध कार्यकारी सोसायटीचे सात लाख, ओझर नागरी सहकारी पतसंस्थेचे ९ लाख,सोनेतारण ८ लाख, हात उसने असे सर्व मिळून सुमारे ३५ ते ३६ लाख रुपयांचे असे कर्ज होते. त्यातच सततच्या नापिकीमुळे नैराश्यातून त्यांनी जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी,आई, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -