मुंबईहून निघालेल्या हातीया एक्सप्रेसच्या दोन बोगींमधील एअर पाइप रविवारी, ३० जूनला पहाटेच्या सुमारास तुटल्याने ही रेल्वे घोटीदरम्यान थांबविण्यात आली होती. दुरुस्तीनंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घोटी-पाडळी रेल्वे स्थानकादरम्यान मुंबईवरुन निघालेल्या हातिया एक्सप्रेस (१२८११) च्या एस-५, बोगी नंबर एस ई. ९८८२४५ च्या खालील बाजुला असलेला एअर प्रेशर तयार करत तो ब्रेकिंग सिस्टमपर्यंत पोहोचवणारा धातूचा पाईप जुना झाल्याने तुटल्याचे सांगण्यात आले. नाशिकरोड-मनमाड रेल्वे इंजिनिअरिंग विभागाला याबाबत माहिती मिळताच तंत्रज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर दुरुस्ती झाली व गाडी रवाना झाली.