घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात ट्रक अपघातात दीडशे कोंबड्यांचा बळी

नाशकात ट्रक अपघातात दीडशे कोंबड्यांचा बळी

Subscribe

अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाने रम्बलर्स किंवा स्पीड ब्रेकर्स टाकावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पंचवटी : औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर शनिवारी (दि.१२) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कोंबड्यांनी भरलेला आयशर ट्रकला झालेल्या अपघातात दीडशेहून अधिक कोंबड्यांचा बळी गेला. वारंवार अपघात होत असतानाही या ब्लॅक स्पॉटवर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.

गेल्या आठवड्यात याच ठिकाणी एस.एम.बी.टी. हॉस्पिटलच्या बसला अपघात झाला होता. त्यात १२ ते १५ परिचारिका जखमी झाल्या होत्या. आता याच ठिकाणी पुन्हा हा अपघात झाला. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नव्हती. दुभाजक नियमबाह्य या चौकात पेट्रोल पंपासमोर दुभाजक ठेवलेला नाही, तसेच औरंगाबाद रोडला येऊन मिळणार्‍या रस्त्यांवर दुभाजक नसल्याने वेगाने वाहने येऊन अपघातांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -