घरमहाराष्ट्रनाशिककांदा निर्यातंबदीचे जिल्ह्यात पडसाद, लिलाव बंद पाडत शेतकर्‍यांचा रास्ता रोको

कांदा निर्यातंबदीचे जिल्ह्यात पडसाद, लिलाव बंद पाडत शेतकर्‍यांचा रास्ता रोको

Subscribe

पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज, बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प

कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने पूर्णतः बंदी घातल्याने परिणामी कांद्याचे दर दीड ते दोन हजार रूपयांनी गडगडल्याने पिंपळगाव बसवंत येथे संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. लासलगाव बाजार समितीत शेतकर्‍यांनी दर घरण्याच्या शक्यतेने लिलावात सहभागच घेतला नाही. तर, चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवा सौम्य लाठीचार्ज केला.

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे. केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे शुक्रवारी सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी जोरदार निषेध केला आहे

- Advertisement -

पिंपळगाव बाजार समितीत गुरुवारी नवीन कांद्याला सरासरी २५०० रू. प्रति क्विंटल तर उन्हाळ कांद्याला ३२०० रुपये सरासरी दर मिळाला होता. शुक्रवारी हेच दर नवीन कांद्याला १८०० रुपयांपर्यंत घसरले. शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडल्याने उन्हाळ कांद्याचे लिलाव झाले नसल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. लासलगाव बाजार समितीत वेगळी स्थिती नव्हती. कांदा घेऊन सुमारे ५०० टेम्पो व ट्रॅक्टर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -