घरक्राइममामाला मारण्यासाठी आलेल्या टोळक्याने भाच्याचा केला खून

मामाला मारण्यासाठी आलेल्या टोळक्याने भाच्याचा केला खून

Subscribe

पूर्ववैमनस्यातून मामाला मारण्यासाठी आलेल्या दोन जणांनी भाच्यालाच संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा देखील करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) रात्री 11 वाजेदरम्यान मुंबई नाक्याजवळील कालिका मंदिरामागील सहवासनगरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, इतरांच्या मागावर पोलीस आहेत.

पियूष भिमाशंकर जाधव (वय २०, रा. सहवासनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. साहिल कृष्णा वांगडे (वय १८), नितीन शंकर दळवी (वय १८), नीलेश रवि नायर (वय २६) आणि ऋषिकेश संतोष जोर्वेकर (वय २०, चौघे रा. सहवासनगर) अशी अटक झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पियूष व फिर्यादी मित्र शुक्रवारी (दि. १९) रात्री अकरा वाजता सहवासनगरात गप्पा मारत होते. त्यावेळी चार संशयितांसह अन्य पाच जणांचे मद्यधुंद अवस्थेत फिर्यादीजवळ आले. या टोळक्याने फिर्यादी तरुणाशी मागील दोन ते तीन वादांची कुरापत उकरुन काढत वाद घातला. हा वाद सुरु असताना पियूष मध्यस्थी झाला. त्यातून वाद वाढत गेला. टोळक्यातील एकाने धारदार हत्याराने पियूषवर वार करुन जखमी केले. त्यानंतर टोळके पसार झाले. वर्मी घाव झाल्याने पियूषचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक दत्ता गोडे, हेडकॉन्स्टेबल देविदास गाढवे, अंमलदार आकाश सोनवणे, किरण सवंत्सरकर आदी दाखल झाले. पथकाने वेगाने तपास करत चार तासांत चौघांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -