घरमहाराष्ट्रNCP : जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित...

NCP : जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा युक्तिवाद

Subscribe

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी शिंदे गटाच्या बाजुने लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला मंगळवारपासून (23 जानेवारी) सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील हे निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष आहेत, असा युक्तीवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. यावर जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. (NCP Jayant Patil is not an elected but an elected state president Argument of Ajit Pawar group)

हेही वाचा – Jitendra Awhad : अजितदादा आधी शरद पवारांचे ऐकत नव्हते अन् आता पंतप्रधानांचे; आव्हाडांचा निशाणा

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अजित पवारांच्या वकिलांकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावर तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली होती. 2022 रोजीच जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपला, असा युक्तीवाद अजित पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. यावर जयंत पाटील यांनी स्वत:चा बचाव करताना म्हटले की, तीन वर्षांसाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरु राहतो. कारण मी निवडून आलेलो आहे आणि मला प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवले होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा – Sanjay Raut On CM Shinde : “ईडीच्या भीतीने भाजपाच्या बिळात जाऊन लपलेल्या…”, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

- Advertisement -

दुसऱ्या दिवसाच्या सुनावणीत काय घडले?

अजित पवार गटाचे वकील : तुम्ही पक्षात कोणत्या पदावर होता? कधीपासून? आणि तुमची निवड कशी झाली?
जयंत पाटील : मी प्रदेश अध्यक्ष पदावर होतो. निवडणूक झाली आणि माझी निवड झाली. 2019 पासून मी या  पदावर आहे. त्याआधी 2018 साली माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 2022 साली विविध जिल्ह्यांमध्ये आणि राज्यात निवडणुका पार पडल्या. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांनी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. 2018 साली निवडणूक झाली, त्यात माझी राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली होती. 2022 मध्ये राज्य पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यात काही जिल्ह्यातील पदाधिकारी निवड झाली तर काही जिल्ह्यात ती सुरू होती. राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. राष्ट्रीय निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर दिल्लीत नॅशनल कन्व्हेन्शन पार पडली. त्यात शरद पवार यांना कार्यालय निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले. इतर राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मला माहिती नाही, पण माझ्या निवडीचे पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मला मिळाले होते.
अजित पवार गटाचे वकील : याचा अर्थ तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून आलात नाही, तर तुमची निवड शरद पवार यांनी केली होती?
जयंत पाटील : कमिटीचा कार्यकाळ हा सुमारे 3 वर्षांचा असतो. त्यावेळी मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो. राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरू होती. पण तोपर्यंत मी कमिटीमार्फत निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो.
अजित पवार गटाचे वकील : तुम्ही 2018पासून प्रदेशाध्यक्ष होता?
जयंत पाटील : तीन वर्षांचा कमिटीचा कार्यकाळ असतो, पण राज्य पातळीवर निवडणूक पूर्ण होईपर्यंत ही कमिटी कार्यरत असते. त्यामुळे माझी प्रदेशाध्यक्ष निवड म्हणून कायम राहते.
अजित पवार गटाचे वकील : 2022 साली राज्य कमिटीची निवडणूक होईपर्यंत तुमची प्रदेशाध्यक्षपदी निवड कोणी केली किंवा आणि तुम्ही निवडून कसे आलात?
जयंत पाटील : 2022 नंतर जिल्हा कमिटीची निवडणूक झाली असे मी म्हटलेले नाही. तर राज्य कमिटीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती, असे मी आधीच नमूद केले आहे.
अजित पवार गटाचे वकील : तुमच्या मते 2021 साली सुरू झालेली राज्य कमिटीची निवडणूक कधी संपली? किंवा ती अद्यापही सुरू आहे का?
जयंत पाटील : प्रक्रिया अद्यापही सुरु आहे. काही लोक पक्षातून बाहेर पडले असल्याचे काही जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे राज्य कमिटीची निवडणूकही घेता आली नाही.
अजित पवार गटाचे वकील : राष्ट्रीय कमिटीची निवड कशी होते? निवडणुकीद्वारे की निवडीद्वारे?
जयंत पाटील : सर्व राज्यातील प्रतिनिधी राष्ट्रीय कमिटीचे सदस्य आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदारांची निवड करतात.
अजित पवार गटाचे वकील : याचा अर्थ सर्व राज्य कमिटीच्या निवडणूक झाल्या नसतील तर घटनेप्रमाणे राष्ट्रीय कमिटीची स्थापना वैध ठरू शकत नाही, हे खरं आहे का? (या प्रश्नावर शरद पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला)
जयंत पाटील : मी असे म्हणालो नाही की, सर्वच राज्यात निवडणुका सुरू होत्या, पण महाराष्ट्रात निवडणुका सुरू होत्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार अस्तित्वात असेलेले सर्व पद त्या राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहू शकतात.
अजित पवार गटाचे वकील : हा कार्यक्रम सर्व निवडणुकांना लागू होतो का?
जयंत पाटील : हा कार्यक्रम सर्व देशभरातील निवडणुकींसाठी लागू होता. पण त्यानंतर हा कार्यक्रम आधी एका पत्रानुसार पुढे ढकलण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -