कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, असे असताना देखील सर्वात जास्त संख्या ही राज्यात आढळून आली आहे. त्यासोबतच या कोरोनाचा विळखा मुंबई आणि पुण्यात अधिकच घट होताना दिसत आहे. मात्र, या अवघड परिस्थितीत राज्य सरकारही वेळोवेळी नागरिकांना घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती पूरवित आहेत. त्यांना सावधान करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील ही पहिली आव्हानात्मक घटना आहे. राज्यात होणाऱ्या उपाययोजनांसाठी उद्धव ठाकरे पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. त्यांचे सोशल मीडियावरदेखील कौतुक केले जात असून ते जनतेशी वेळोवेळी संवाद साधत आहेत.
We all are facing an unprecedented crisis. Apart from the virus we are also fighting fear, anxiety & uncertainty. We must appreciate our CM #UddhavThackeray ji for communicating with us regularly with utmost clarity and compassion. #Respect @AUThackeray https://t.co/4GuWTRNWKZ
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 26, 2020
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असताना आता अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक करणारे एक ट्विट केले आहे.
काय म्हणाले रितेश देशमुख?
अभिनेता रितेश देशमुख म्हणाले की, ‘सध्या देशवासीय एका मोठ्या संकटाशी सामना करीत आहेत. कोरोना व्हायरसशिवाय आपण भीती, चिंता यांच्याशीही लढा देत आहोत, अशा परिस्थितीतही आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नियमित जनतेशी संवाद साधत आहेत आणि परिस्थितीबाबत जनतेच्या मनात गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी स्पष्टता आणत आहेत. यासाठी मुख्यमंत्री करीत असलेले काम अभूतपूर्व आहे. त्यांच्याबद्दल आदर वाटतो.’
हेही वाचा – देशात कोरोनाच्या संसर्गात पुणे आघाडीवर