घरमहाराष्ट्र'शासन आपल्या दारी' अन् खर्चही सर्वसामान्यांच्या माथ्यावरी; शरद पवार गटाची सरकारवर टीका

‘शासन आपल्या दारी’ अन् खर्चही सर्वसामान्यांच्या माथ्यावरी; शरद पवार गटाची सरकारवर टीका

Subscribe

मुंबई : राज्य सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’वर होणाऱ्या खर्च देखील सर्व सामान्यांच्या माथ्यावर आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम बीड जिल्ह्ल्यातील परळी येथे होणार आहे. या कार्यक्रमावर केलेला जाणारा खर्चावर राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहे.

परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास 2 कोटी 21 लाख 90 हजार 850 रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी 81  लाख 94  हजार 100 रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. साईड मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे तर इलेक्ट्रिक कामांसाठी 79 लाख 82 हजार 510 रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भिडे गुरुजी आता सरकारचे सांगकाम्या म्हणून फिरतात का? जरांगे पाटील भेटीवरून वडेट्टीवारांचा निशाणा

17 ऑगस्ट रोजी परळी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेला देखील भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. आता शासन आपल्या दारी उपक्रमासाठी देखील तोडीसतोड मंडप उभारण्याचे नियोजन आहे मात्र यंदा खर्च करदात्यांच्या खिशातून केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -