घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री ब्राम्हण आहेत, पंचांग बघूनच मंत्रीमंडळ विस्तार करतील - शिवसेना नेते गुलाबराव...

मुख्यमंत्री ब्राम्हण आहेत, पंचांग बघूनच मंत्रीमंडळ विस्तार करतील – शिवसेना नेते गुलाबराव पाटील

Subscribe

राहू कोण, केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मूहूर्त काढतीलस असे गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. ते नाशिकमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राहू कोण, केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मूहूर्त काढतीलस असेही गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत. पंचागाच्या आधारे ते कधी मुहूर्त काढतात. यावर आता मंत्रिमंडळ विस्तार अवलंबून आहे. राहु कोण, केतू कोण हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते मुहुर्त काढून त्यांना मार्गी लावतील. मागच्या विस्तारात माझा मंत्रिमंडळात समावेश झाला. आता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या डोक्यातील कोण आहेत हे पाहावे लागेल.

- Advertisement -

यावेळी गुलाबराव पाटील यांनी पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवर निशाणा साधला. आधी पेट्रोल पंपावरच्या पोस्टरवर मोदींसोबत वृद्ध स्त्री असायची, आता मॉडेल दिसते, असे पाटील म्हणाले. पेट्रोलचे दर गगनाला भिडले तरी लोक भाजपलाच पसंत करत आहेत, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -