घरमहाराष्ट्रपुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही

पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही

Subscribe

‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही. दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत’, अशीही गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाजनादेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. दोन्हीही काँग्रेसनी आता आपण केलेल्या चुकांबद्दल जनतेची माफी मागवी. तसे केल्यास थोडीफार मते त्यांना मिळतील आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करता येईल, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसला यावेळी धारेवर धरले. ‘कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही काँग्रेसच्या यात्रेकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे’, असे टोला फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

ईव्हीएम २००४ साली देशात आले आणि २०१४ पर्यंत राज्यात व देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता होती. त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हते. मग भाजप जिंकायला लागला की ईव्हीएम खराब कसे काय झाले, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. सुप्रिया सुळे जिंकल्या तेव्हा ईव्हीएम खराब नाही. मात्र डॉ. सुजय विखे जिंकले तर हे ईव्हीएम खराब झाले, अशी टीका मुख्यमंत्र्यानी केली.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -