घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : खोटारड्या आणि फसव्या सरकारच्या चहापाण्याला जाणार नाही - वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : खोटारड्या आणि फसव्या सरकारच्या चहापाण्याला जाणार नाही – वडेट्टीवार

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (26 फेब्रुवारी) राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापाण्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती देताना सांगितले की, खोटारड्या आणि फसव्या सरकारच्या चहापाण्याला जायचे नाही, हे आम्ही ठरवले आहे. (Wont go to tea party of fake and deceitful government Vijay Wadettiwar)

हेही वाचा – Manoj Jarange VS Fadnavis : जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप; वडेट्टीवार म्हणतात, चौकशी करावी

- Advertisement -

अधिवशेनाच्या पूर्व संध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधीमंडळातील काँगेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनिल प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली असून राज्याच्या आदर्श, सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबोट लागले आहे. गुंड मंत्रालयाता रिल बनवतात. पुण्यात 200 गुंडांची परेड होते, त्यानंतर पुण्यात 2200 कोटींचे ड्रग सापडते तरी सरकार गप्प आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने पोलिसांना गुंड जुमानत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर गुंडांशी सल्लामसलत केली जाते. आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. प्रक्षोभक विधान करून, चिथावणीखोर भाषण करून राजकीय वातावरण काही लोकप्रतिनीधी गढूळ करतात. खुलेआम स्टेजवरून माता-भगिनींविषयी काहीही बोलले तरी देखील सरकार त्यांना पाठीशी घालते आहे. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकार करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange : सागर बंगल्याकडे जाण्यासाठी मनोज जरांगे रवाना; मराठा बांधवांकडून रोखण्याचा प्रयत्न

सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोर्टात न टिकणारं आरक्षण दिलं आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपयांचे अनुदान दिले नाही. तरीही सरकार टेंभा मिरवते आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीने या खोटारड्या आणि फसव्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारने केवळ कंत्राटदार, घोटाळेबाजांचे हित जोपासले आहे. कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचाराने हिमनगाचे टोक गाठले आहे. राज्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. तरी देखील सरकारला गांभीर्य नाही. येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष. पक्ष फोडाफोडत व्यस्त असलेल्या सरकारला जनतेच्या कामासाठी वेळ नाही. विदर्भातील प्रश्न, शेतकऱ्याबद्दल अनास्था, घोटाळ्यांची मालिका, भ्रष्टाचाराला ऊत, दलित, आदिवासींवर अन्याय, मुस्लीमांवर अन्याय, ड्रग प्रकरण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे.

हेही वाचा – Maratha Reservation: जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मराठा-ओबीसी, एनटी (धनगर)-एसटी (आदिवासी), दलित-सवर्ण, हिंदू-मुस्लिम यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण केले गेले. याला सरकारचा आशिर्वाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सर्व समाज एकत्र नांदत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी या समाजात भांडणे लावण्याचा उद्योग सरकारने केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पेपरफुटी प्रकरणे एकामागून एक समोर येत आहे. परीक्षार्थींमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. युवकांच्या आशा धुळीला मिळवणाऱ्या या सरकारचे चहापान घेणे म्हणजे युवकांचा अपमान होईल, त्यामुळे या चहापानावर बहिष्कार टाकला आहे, असा पुनरुच्चार वडेट्टीवर यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -