घरमुंबईवंदे भारत अभियान अंतर्गत परदेशातून मुंबईत परतले ९०६ प्रवाशी

वंदे भारत अभियान अंतर्गत परदेशातून मुंबईत परतले ९०६ प्रवाशी

Subscribe

मुंबईतील ४३ हॉटेल्समध्ये केले १ हजार १२८ प्रवाशांना केले क्वारंटाईन

वंदे भारत अभियान अंतर्गत मुंबई विमानतळावर १७ विमानांतून २ हजार ४२३ भारतीय नागरिक शुक्रवारपर्यंत विदेशातून परतले आहेत. यापैकी ९०६ प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत तर उर्वरित महाराष्ट्रातील १ हजार १३९ आणि इतर राज्यातील ३७८ प्रवासी आहेत. दिनांक ७ जूनपर्यंत आणखी १३ विमानांनी विदेशातील भारतीय नागरिक परतणार आहेत. दरम्यान, परतलेल्या नागरिकांपैकी मुंबईतील विविध ४३ हॉटेल्स्‌मध्ये मिळून सुमारे १ हजार १२८ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापुढे दिनांक ७ जूनपर्यंत जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून मुंबईत भारतीय नागरिक परतणार आहेत.

वंदे भारत अभियान अंतर्गत परदेशातून भारतीय मायदेशी

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदे भारत अभियान अंतर्गत भारतात परत आणण्यात येत आहे. मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासनाने सर्व कार्यवाही आखली आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा समन्वयाने कामकाज करत आहेत.यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांच्या मार्गदर्शनाने अपर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी उद्धव घुगे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी पद्माकर रोकडे व उमेश बिरारी यांच्यासह प्रत्येक पथकामध्ये १५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, संचालक (भूसंपादन) अनिल वानखेडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैयासाहेब बेहरे यांच्यासमवेत सुमारे ५० अधिकारी-कर्मचारी यांचे पथक दररोज यासंदर्भातील अंमलबजावणीवर देखरेख ठेवत आहेत. मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन) ची सुविधा म्हणून मुंबई महानगरपालिकेने ८८ हॉटेलमध्ये मिळून ३ हजार ३४३ कक्ष आरक्षित केले आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन विशेष विमानांनी परत येणाऱया नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून  क्वारंटाईन केले जात आहे. प्रामुख्याने इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. इतर जिल्हे व राज्यातील नागरिकांना त्यांचे संबंधित जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत क्वारंटाईन केले जाणार आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाईन व्यवस्थेमध्ये पाठवले जाते. वाहतूक परवाना संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येते.

- Advertisement -

आता सर्व कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार

प्रारंभी विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे विमानतळ यंत्रणेमार्फत तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येते. त्यानंतर महसूल विभागनिहाय उपलब्ध असलेल्या टेबलवर जाऊन प्रवाशांना वाहतूक परवाना अर्थात दिला जातो. हा परवाना घेऊन द्वार क्रमांक ४ येथे प्रवासी येतात. तेथून प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहने पुरवतात. तर बृहन्मुंबईतील नागरिकांना बेस्ट बसेसमार्फत रवाना केले जाते. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळदेखील बसेस पुरवत आहे.

कोणत्या राष्ट्रातून किती प्रवाशी परतले

  • दिनांक १० मे २०२० : लंडन येथून ३२६, सिंगापूरहून २४३ आणि मनिला येथून १५०
  • दिनांक ११ मे २०२० : सॅनफ्रान्सिको येथून १०७ आणि ढाका येथून १०७.
  • दिनांक १२ मे २०२० : न्यू यॉर्क येथून २०८ तर क्वालालम्पूर येथून २०१
  • दिनांक १३ मे २०२० : शिकागो येथून १९५, लंडन येथून ३२७ तर कुवेत मधून २
  • दिनांक १७ मे २०२० : अदिस अबाबाहून ७८ तसेच काबूल येथून १२
  • दिनांक १८ मे २०२० : मस्कत येथून १६ जण,
  • दिनांक १९ मे २०२० : मनिला येथून ४१ जण
  • दिनांक २० मे २०२० : मनिला येथून २९ जण
  • दिनांक २१ मे २०२० : जकार्ता येथून १८५ जण
  • दिनांक २२ मे २०२०: जोहान्सबर्गमधून १९६ जण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -