घरमुंबईमध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

Subscribe

भांडुप ते कांजुरमार्ग स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. मात्र हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे.

भांडुप ते कांजुरमार्ग स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी ठप्प झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता. यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते. लोकल एका मागोमाग एक थांबल्या असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. भांडुप ते कांजुरमार्ग दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र आता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -