मुंबईसह राज्यभरात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने असा अंदाज वर्तवला आहे. तसेच,’ गरज असेल तरच घराबाहेर पडा’, असेही आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची आणि अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून २४ तासात २०० मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
India Meteorological Department (IMD), has shared forecast of heavy to very heavy rainfall (upto 200 mm) in the next 24 hours.
We request Mumbaikars to take precautions & ensure safety. #Dial100 in case of any emergency.
Take care Mumbai #MumbaiRains
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) July 8, 2019
गरज असेल तरच घराबाहेर पडा
आज सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. तसाच पाऊस दिवसभर राहिल, असेही सांगण्यात आले आहे. अशा आशयाचे मुंबई पोलीस आयुक्तांनीही ट्विटरद्वारे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे सेवेवर देखील याचा परिणाम होत असल्याने चाकरमान्यांची मोठी अडचण होत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असल्याने रस्तेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा – मुसळधार पाऊस, तरीही जायकवाडी तहानलेलंच
हेही वाचा – मुंबईत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस; पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा