घरमुंबईपावसाच्या जोराने रेल्वे वाहतूक मंदावली

पावसाच्या जोराने रेल्वे वाहतूक मंदावली

Subscribe

मध्यरात्री पासून सुरु असलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. पावसाच्या जोराने मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशीराने तर हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक २५ मिनिटे उशीराने धावत आहे.

मुंबईसह उपनगरात मध्य रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. ठाणे, डोंबिवली,कल्याण, बोरिवली, जोरेश्वरी, दहीसर या भागात जोरदार पावसामुळे रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने होत आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनीटांने उशीराने धावत आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटांने उशीरांने आहे. तसेच येत्या ४८ तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -