इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताचा महिला हॉकी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला असल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. तर जपानच्या महिला संघाने भारताला अंतिम सामन्यात २-१ च्या फरकाने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे.
FT| The Indian Women’s Hockey Team were put to the test by a challenging Japanese side as they claim the Silver medal at the @asiangames2018 after a valiant effort by the Eves goes unrewarded on 31st August.#IndiaKaGame #AsianGames2018 #INDvJPN pic.twitter.com/lxEMBNLauV
— Hockey India (@TheHockeyIndia) August 31, 2018
असा झाला सामना
भारत आणि जपान यांच्यातील सामना सुरूवातीपासूनच चुरशीचा सुरू होता. सामन्याच्या ११ व्या मिनीटालाच भारताच्या बचावफळीला भेदत जपानच्या शिमझूने गोल करत सामन्यात जपानला १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताच्या नेहा गोयलने २५ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर मध्यांतरापर्यंत १-१ असाच स्कोर होता. त्यानंतर दोन्ही संघांकडून गोल करण्याचे काही प्रयत्न करण्यात आले. मात्र एकाही संघाला गोल करण्यात यश आले नाही. मात्र ४४ व्या मिनीटाला जपानने गोल करत सामन्यात २-१ ची आघाडी मिळवली. सामन्याच्या अखेर पर्यंत भारताला बरोबरी साधता न आल्याने जपानने सामन्यात २-१ ने विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.