अल-जझीरा या वृत्तवाहिनीने २०१८ साली ‘क्रिकेट्स मॅच फिक्सर्स’ नामक माहितीपट (डॉक्यूमेंट्री) प्रदर्शित केला होता. यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात २०१६ मध्ये झालेली चेन्नई कसोटी, तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१७ मध्ये झालेली रांची कसोटी फिक्स केल्याचे म्हटले गेले होते. मात्र, त्यांचा हा दावा खोटा असून भारताचे कोणतेही सामने फिक्स करण्यात आले नव्हते, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी दिले. अल-जझीराने या माहितीपटामध्ये पाच जणांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. मात्र, हे पाचही जण निर्दोष असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
दाव्यामध्ये तथ्य नाही
अनिल मुन्नावर नामक बुकीने काही खेळाडूंशी आपला संपर्क असल्याचे, तसेच काही सामने फिक्स केल्याचे अल-जझीराच्या माहितीपटामध्ये म्हटले होते. फिक्स करण्यात आलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या दोन कसोटीचा समावेश होता. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यावर आयसीसीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. मात्र, अल-जझीराने केलेल्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे आयसीसीने आता स्पष्ट केले आहे.
ICC has concluded its investigation into the documentary programme ‘Cricket’s Match Fixers’ broadcast by Al Jazeera.
Read more on the judgement 👇https://t.co/Fo88FAXlS1
— ICC (@ICC) May 17, 2021
सामने फिक्स असू शकत नाहीत