- Advertisement -
‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलंय. दरम्यान, ‘काही लोक स्वत:लाच धर्मवीर म्हणतात, आता तर धर्मवीर पार्ट 2 येतोय,’ असादेखील टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावलाय.
- Advertisement -