- Advertisement -
सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने वेळीच आमदारांच्या विनंतीला मान देत निलंबन मागे घेतले असते तर विधानसभेची अब्रू वाचली असती, अशी खरमरीत टीका फडणवीसांनी केली.
- Advertisement -