- Advertisement -
लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर काही तासांमध्येच मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर गोळा झाले होते. शेकडोंच्या संख्येने अचानक हा जमाव एकत्र आल्यामुळे पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी काही प्रमाणात लाठीचा वापर करावा लागला. या मुद्द्याला धरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
- Advertisement -