- Advertisement -
केंद्र शासनाचे पोर्टल बंद पडल्याने ५० ते ६० शेतकऱ्यांचा मका पडून राहिला होता. या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना घेराव घातण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसिलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच खासदार भारती पवार आणि खासदार सुभाष भामरे यांच्या दुरध्वनीद्वारे संपर्क साधून याची कल्पना देण्यात आली. दोन्ही खासदारांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा करून, आलेला मका मोजून घ्यावा, त्याला नंतर मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला मका आता मोजला जाणार आहे.
- Advertisement -