- Advertisement -
मोखाडा तालुक्यातील जवळपास ७० गावा-पाड्यांना फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन २० टँकरद्वारे या गाव पाड्याना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही दिवसागणिक नवीन गाव पाड्यांना टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रस्ताव येऊन पडत आहेत. मात्र ज्या गाव पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशा बर्याचशा टँकरना गळती लागली असुन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
- Advertisement -